मानवी जीवन विविध भावनांचे मिश्रण आहे प्रत्येक मानवाच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना
त्याच्या जीवनामध्ये विविध भावनांचा संगम होत असतो. आणि या विविध भावनांचा समन्वय ज्याला साधता येतो तोच माणूस जीवनामध्ये यशस्वी होतो. जीवनामध्ये आनंदी होतो त्याला यश प्राप्ती होते .
म्हणून भावभावनांचे समायोजन खूप महत्त्वाचे आहे. आपण मानवी जीवनातील साहसी भावना खूप महत्त्वाची आहे.
साहस म्हणजे कठोर परिश्रम करणे, सातत्याने आपले लक्ष साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे
छत्रपती शिवाजी महाराजांपासून ,संतांपासून क्रांतीकारकांपासून , समाजसुधारकांपासून आपण साहस ही प्रेरणा घेतली पाहिजे. त्यांच्या जीवनामध्ये असंख्य अडचणी आल्या मात्र ते कधी डगमगले नाहीत .
साहस ही भावना मनात असल्यामुळे अडचणीला सामोरे गेल्यामुळे त्यांना यशाचे शिखर घाटता आले आणि आजही त्यांचे प्रेरणादायी विचार प्रेरणादायी कार्य टिकून आहे
आपल्या भारत देशावरील परकीय सत्ता उलथवून लावण्यास साहसी भावना त्यांच्या ठाई ठाई होती.
पृथ्वीवरील सर्व महान व्यक्तींनी
जीवनच्या अडथळ्यांना तोंड दिल्यामुळे साहस भावनेमुळे त्यांच्या आणि समाजाच्या जीवनमध्ये आनंद भरला आहे
वारंवार अपयश आले तरी ते डगमगले नाही त्यांच्या अंतर्मनात असलेली साहस भावना नेहमी त्यांना दिशादर्शक होती..
साहस भावना असल्यास, कार्य करण्याची भावना जागृत होते.
कर्मठ वृत्ती आणि उदार भावनांमुळे शारीरिक ऊर्जा निर्माण होती
वारंवार अपयश मिळूनही उत्साह कमी न होणं हीच यशाची पायरी आहे.
जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर सहसाने तुम्ही जीवनातील प्रत्येक संकटाचा सामना केला पाहिजे.
सातत्याने आपले लक्ष निश्चित करून त्या लक्षाच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे ध्येय प्राप्ती होईपर्यंत न घाबरता न भीती बाळगता कष्टाच्या जोरावर तुम्ही तुमचे जीवन सुंदर करू शकता यश हे तुम्हाला नक्कीच मिळणार आहे म्हणून
म्हणून म्हणतात
लहरो से डरकर नौका कभी पार नही होती!!
कोशिश करने वाले की कभी हार नही होती कभी हार नही होती!!!
विजयकुमार किसन भुजबळ
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाष नगर
तालुका कोरेगाव जिल्हा सातारा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏