blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

डॉ. एम.एस. स्वामीनाथन


  

*भारतरत्न डॉ. एम.एस. स्वामीनाथन*

. (भारतीय शास्त्रज्ञ)

पूर्ण नाव : डॉ. मोणकोंबू सांबशिवन स्वामीनाथन *जन्म : ७ ऑगस्ट, १९२५ (कुंभकोणम तामीलनाडू) मृत्यू : २८ सप्टेंबर, २०२३* डॉ. स्वामीनाथन हे भारतातील कृषी शास्त्रज्ञ होते. भारतात हरितक्रांती घडवून आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांनी कृषि क्षेत्रातील संशोधनासाठी 'एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशन'ची स्थापना केलेली आहे. भारत सरकारने डॉ. मोणकोंबू सांबशिवन स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली स्वामीनाथन आयोगची स्थापन केला.

👨🏻 *वैयक्तिक आयुष्य*

मोणकोंबू सांबशिवन स्वामीनाथन यांचा जन्म तमिळमाडूमध्ये कुंभकोणम येथे झाला. त्यांचे वडील डॉक्टर होते. ते गांधीवादी व स्वदेशीचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या विचारांचा स्वामीनाथनांवर चांगला परिणाम झाला. वडिलांप्रमाणे तेही डॉक्टरी शिक्षणाकडे वळले. पण १९४३मधील बंगालच्या दुष्काळामुळे त्यांनी ते शिक्षण अर्धवट सोडून दिले आणि ते शेतकी विषयाचे शिक्षण घेऊ लागले. केरळ्मधील महाराजस कॉलेजातून त्यांनी कृषिक्षेत्रातली पदवी घेतली.

स्वामीनाथन यांचा विवाह मीना स्वामीनाथन यांच्याशी झाला होता. हे दोघे केंब्रिजमध्ये शिकत असताना १९५१ मध्ये त्यांची भेट झाली होती. ते चेन्नई, तामिळनाडू येथे राहत होते. सौम्या स्वामीनाथन (एक बालरोगतज्ञ), मधुरा स्वामीनाथन (अर्थशास्त्रज्ञ) आणि नित्या स्वामीनाथन या त्यांच्या तीन मुली आहेत.


गांधी आणि रमण महर्षी यांचा त्यांच्या जीवनावर प्रभाव होता. त्यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या २,००० एकरपैकी एक तृतीयांश त्यांनी विनोबा भावे यांच्या कारणासाठी दान केले. २०११ मध्ये एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की जेव्हा ते तरुण होते तेव्हा त्यांनी स्वामी विवेकानंदांचे अनुसरण केले.


स्वामीनाथन यांचे चेन्नई येथील त्यांच्या घरी २८ सप्टेंबर २०२३ रोजी वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले.

🌀 *कारकीर्द*

कृषिक्षेत्रात काम करावयाचे नक्की झाल्यावर स्वामीनाथन यांनी मद्रास कृषि महाविद्यालयातून आणखी एक पदवी घेतली. १९४७ साली ते दिल्लीच्या इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी रवाना झाले. १९४९मध्ये विशेष प्रावीण्यासह त्यांनी ती पदवी प्राप्‍त केली. युनियन पब्लिक सर्व्हिसची परीक्षा देऊन ते भारतीय पोलीस सेवेसाठी पात्र ठरले, मात्र त्यांनी पोलीस ऑफिसर न होता कृषी क्षेत्रात संशोधन करायचे ठरवले. नेदरलॅंडमध्ये बटाटाच्या अनुवांशिकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांना मिळालेल्या शिष्यवृत्तीतून त्यांनी १९५२मध्ये पी‍एच.डी. केले आणि परदेशांत विविध संधी असतानाही ते भारतात परतले. जगभरांतील कृषी विद्यार्थ्यांबरोबर त्यांनी कृषिसंशोधनाबरोबर वनस्पतींची पैदास आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन या विषयांवर काम केले आहे. भारतीय गरीब शेतकऱ्यांच्या शेतांत गव्हाचे व तांदळाचे उच्च उत्‍पन्‍न देणारे वाण पेरून हरितक्रांती घडवून आणण्याचे श्रेय स्वामीनाथन यांनाच जाते. त्यांच्या प्रयत्‍नांमुळेच गहू व तांदूळ यांच्या उत्पादनांत भारत स्वयंपूर्ण होऊ शकला.


🎖️ *डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांना मिळालेले पुरस्कार*

२०२४ मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.

पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आदी पद्म पुरस्कार

रॅमन मॅगसेसे पुरस्कार, World food prize 1987

शांति स्वरूप भटनागर पुरस्कार 1961

जागतिक अन्न पुरस्कार 1987 हा कृषी क्षेत्रातील पहिला सर्वोच्च सन्मान

अल्बर्ट आईन्स्टाईन जागतिक विज्ञान पुरस्कार

🎯 *उल्लेखनीय*

ऑक्टोबर १९८७ मध्ये स्वामिनाथन यांना प्रथम जागतिक अन्न पुरस्कारच्या सादरीकरणाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस, जॅव्हियर पेरेझ डी कुएललर यांनी लिहिले: "डॉ. स्वामीनाथन हे एक जीवंत आख्यायिक

आहेत. कृषी विज्ञानातील त्यांचे योगदान "भारत आणि विकसनशील जगात इतरत्र अन्न उत्पादनावर अविभाज्य छाप पाडली. कोणत्याही मानकांनुसार ते दुर्मिळ भेद असणारा जागतिक वैज्ञानिक म्हणून इतिहासात नोंद घेतली जाईल. स्वामिनाथन यांचे संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमात "आर्थिक पर्यावरणशास्त्र जनक" असे वर्णन केले गेले आहे.

टाईम मासिकाच्या १९९९ च्या २० व्या शतकातील २० सर्वात प्रभावशाली आशियाई लोकांच्या यादीमध्ये भारतातील तिघांपैकी एक होते, इतर दोन महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर." १९ ऑक्टोबर २००६ रोजी, आयोवा येथील डेस मोइन्समधील नॉर्मन ई. बोरलाग आंतरराष्ट्रीय संगोष्ठीमध्ये स्वामीनाथन वैशिष्ट्यीकृत वक्ता होते. त्यांचे मानव संसाधन राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेचे संबद्ध मानवता आयोवा यांनी प्रायोजित केले. स्वामीनाथन यांनी "तिसरे वार्षिक राज्यपाल व्याख्यान" सादर केले आणि "ग्रीन रिव्होल्यूशन रिडक्स: सर्व मानवी इतिहासामध्ये अन्न उत्पादनाचा एक सर्वात मोठा कालावधी पुन्हा बनवू शकतो?" च्या सांस्कृतिक आणि सामाजिक पायाविषयी भारतातील हरितक्रांती आणि तेथील हरित क्रांतीला प्रेरणा देणारी महात्मा गांधी यांच्यासारख्या भारतातील ऐतिहासिक नेत्यांची भूमिका, व्यापक भूक निर्मूलनाची हाक देऊन. त्यांनी गांधी आणि आयोवाचे थोर वैज्ञानिक जॉर्ज वॉशिंग्टन कारव्हर यांच्यातील संबंधांविषयी सांगितले. 


         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.