blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

आनापान उपक्रम ....

 आपल्या मनातील चिंता, क्रोध, द्वेष, एकाग्रतेचा अभाव, शंका, आळशीपणा, लोभ, अस्वस्थता इत्यादी विविध अडथळ्यांपासून आपल्याला मुक्त करण्यासाठी आनापान हे एक प्रभावी साधन आहे.

आनापान साधनेचा ऑडिओ डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा


https://drive.google.com/file/d/1VwmJuf9B-DevQIGi2hJiBByF5bqlqk5e/view?usp=drivesdk

सुरुवातीच्या 70 मिनिटांच्या प्राथमिक प्रशिक्षणानंतर शालेय मुले शाळा सुरू करण्यापूर्वी दररोज १० मिनिटे या तंत्राचा अभ्यास करू शकतात आणि आणि घरी जाण्यापूर्वी दहा मिनिटांसाठीही हा सराव पुन्हा करू शकतात.


आनापान प्रशिक्षणात सहभागींनी त्यांचे नाकपुडीच्या प्रवेशद्वाराकडे लक्ष केंद्रित करून येणारा श्वास आणि जाणारे श्वास यावर लक्ष केंद्रित करायला शिकले पाहिजे. श्वासोच्छवासाचा प्रवाह बदलण्याचा किंवा दुरुस्त करण्याचा प्रयत्न न करता त्यांच्या नैसर्गिक श्वासाचे निरीक्षण करावे. अशाप्रकारे, त्यांना आत्म-जागृतीच्या सुरुवातीच्या चरणांचा अनुभव येतो. हे तंत्रज्ञान कोणत्याही कल्पनाशक्ती किंवा मूल्यांकनाशिवाय, निरिक्षण आधारित आणि वैज्ञानिक आहे. हे तंत्र "अनापान" म्हणून ओळखले जातेजाते.






आनापान ध्यान साधना करण्याचे फायदे


1- मन एकाग्र (concentrate) होण्यास मदत होते.


2- मनातील भिती, चिंता, ताणतणाव दूर होतात.


3- घबराहट (nervousness) नैराश्यचे प्रमाण कमी होते.


4- अभ्यासात मन लागते. चांगले लक्षात राहते.


5- विविध प्रकारचे खेळ, कला यामध्ये कौशल्य प्राप्त करण्यास मदत होते.


6- काहीही समजून घेण्याची आणि स्पष्टीकरण देण्याची शक्ती वाढते.


7- स्वतः मध्ये आत्मविश्वास (self confidence) निर्माण होतो.


8- जाणीव जागृती (awareness) वाढते. कोठे कसे वागावे बोलावे याचे ज्ञान प्राप्त होते.


9- परस्पर समरसता वाढते.


10- मन खूप (powerful) होते.


11- एकमेकांना सहकार्य करण्याची वृत्ती निर्माण होते. 


🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.