blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

कर्माचा सिद्धांत

 *कर्माचा सिद्धांत*

आई बाबांशी कसं वागतो आपण!

😊😊😊😊😊😊😊😊

       कोणतीही स्त्री किंवा पुरुष ज्यांचं वय वर्षे साठ अथवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांना जेष्ठ नागरिक असे संबोधण्यात येते . साधारणपणे या वयात माणसाला मानसिक व शारीरिक थकवा येत असतो .शरीर साथ देण्यास हळूहळू असमर्थ ठरू लागते. त्यामुळे थोडीशी चिडचिड हटवादीपणा वाढतो . म्हातारपण म्हणजे कळत्या वयातील एक बालपण असते.

       आयुष्याच्या या टप्प्यावर त्यांना एकाकी व नीरस आयुष्य जगावे लागत आहे .सामाजिक सुरक्षितता नाही . काही कौटुंबिक अत्याचाराने पिडीत आहेत . काही लोक आजही एकाकी जीवन जगत आहेत . प्राण्यांच्याही वाट्याला येऊ नये असे हलाखीचे दीनवाणे जीवन कित्येकांच्या वाट्याला येताना दिसत आहे . विभक्त कुटुंब पद्धतीमुळे समाजात ‘आम्ही अन आमची मुले” एवढा संकुचित दृष्टिकोन निर्माण झाला आहे . त्यांना घरातील म्हातारी माणसं म्हणजे एक अडगळ वाटतात किंवा त्यांच्या संसारातील अडसर वाटू लागतात . ही विचारसरणी दिवसेंदिवस मूळ धरू लागली आहे.

         आजकालच्या मुलांना आजी-आजोबांचा सहवास मिळत नाही त्यामुळे त्यांच्यावर संस्कार तरी कसे होणार? शहरीकरणाच्या ठिकाणी जागेअभावी किंवा महागाईमुळे आई-वडिलांना गावी पाठवले जाते . कामानिमित्त दिवसभर बाहेर असलेले आई-वडील मुलांवर संस्कार कधी करणार ? त्यांना पुराणातील बोधकथा , संस्कार कथा कोण सांगणार ?

          आज वृद्धाश्रमांची संख्या वाढणे हे कशाचे द्योतक आहे ? का आई-वडिलांना मुलेबाळे असूनही वृद्धाश्रमांमध्ये जीवन व्यथीत करावे लागते ? का त्यांचे थकलेले डोळे आजही निमिषात पाहून कुणीतरी आपला येईल म्हणून वाट पाहत असतात ? या सगळ्याच्या मुळाशी आजची कुटुंब पद्धती आहे.

       जीवनामध्ये आपण संस्कारांना तिलांजली दिलेली आहे. तोही एक जीव आहे याचा आपल्याला विसर पडला आहे. आपल्या आई-वडिलांना आपण जशी वागणूक देतो तशी प्रेमाची वागणूक सासू-सासऱ्यांना का मिळू नये ? सर्रासपणे १५ टक्के स्त्रिया सोडल्या तर इतरांच्या मनात मत्सराची भावना अधिक दिसते. लग्नानंतर पती एवढे हतबल का होतात ? का त्यांना मातेच्या पान्हयाचा विसर पडतो ? का त्यांना आई वडिलांच्या काळजातील वेदना जाणवत नाहीत ? एवढी स्वार्थी कशी काय मुलं होऊ शकतात ? 

      शेवटी पेराल तसे उगवाल . मुलं नेहमी अनुकरण करत असतात. आपणही कधीतरी म्हातारे होणार आणि त्यावेळी आपल्या मुलांनी आपल्याला वृद्धाश्रमाची वाट दाखवली तर त्यात त्यांचं काय चुकलं ? म्हणून अजुनही वेळ गेली नाही . वेळीच सावध व्हा. शासनाने सेवा ज्येष्ठांसाठी कित्येक धोरणे , योजना आखल्या परंतु कार्यालयाच्या पायऱ्या झिजवून पदरी निराशाच पडते . कुणीही पोटतिडकीने माईचा लाल शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढे सरसावत नाहीये . 

    *इतकी का माणुसकी मेलेली आहे ?*

थोडासा विचार करू, आणि बदल घडवू.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

शुभं भवतु

क्रमशः

✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻

अजित राक्षे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.