मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

सोमवार, ४ ऑगस्ट, २०२५

संवर्ग 4 शिक्षक बदली 2025 साठी उपयुक्त माहिती

 *✳️बदली पात्र व 1 युनिट शंका समाधान* 

*संजय नागे दर्या.अमरावती*

*9767397707*


*दि. 4 ऑगस्ट 2025*

*संपुर्ण बदली प्रक्रियेसंबधी काही शंका किंवा अडचणी येत असल्यास वरील नंबर वर कॉल करू शकता*


*बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची बदली प्रक्रिया 2025..संपलेली असून बदली झालेल्या शिक्षकांच्या याद्या  CEO लॉगिन ला प्राप्त  झालेल्या आहेत काही वेळातच बदली झालेल्या शिक्षकांची यादी प्रकाशित करण्यात येईल* 


*संवर्ग 4 साठी सुधारित रिक्त पदांची यादी  आज दुपार पर्यंत येण्याची शक्यता आहे त्यानंतर लगेच संवर्ग 4 करिता अर्ज भरण्यासाठी सुविधा मंगळवारी सुरू होणार आहे.*


*✳️ बदली पात्र शिक्षकांना 1 युनिट मध्ये फॉर्म भरताना येणाऱ्या शंका व समाधान*


*(सध्या परिस्थितीत बदली प्रक्रिया ही 18 जून 2024 च्या शासन आदेशानुसार होत असून शासन आदेशातील भाषा ही संदिग्ध असते त्यामुळे शासन आदेशातील प्रत्येकच मुद्द्याचा शब्दशः अर्थ लावू नये)*


*➡️ 1) प्राधान्य क्रम भरताना घाई करू नये कारण प्राधान्यक्रम भरण्याकरिता 4 दिवस दिलेले आहे आपण असलेल्या सर्व परिस्थितीचा अभ्यास करूनच प्राधान्यक्रम भरावा*


*➡️ 2) बदली पात्र शिक्षकांना 30 किंवा पोर्टलवर 30 पेक्षा कमी असल्यास तेवढे प्राधान्यक्रम भरणे अनिवार्य राहील*


*➡️ 3) 1 युनिट चा लाभ घेताना पती-पत्नी जिल्हा परिषदेचे शिक्षक असून दोघांमधील अंतर 30 किलोमीटर असणे अनिवार्य आहे* 


*➡️ 5) परंतु अशा पती पत्नीला 1 युनिट मधून बदली घ्यायची नसेल तर 1 युनिट हे अनिवार्य नाही म्हणजेच पती-पत्नी 30 किलोमीटरच्या आत असतील तरीही त्यांना एक युनिट मधून आवश्यकता नसल्यास बदली घेणे बंधनकारक नाही*


*➡️ 6)1 युनिट मधील शिक्षकांपैकी एक बदली पात्र शिक्षक आहे आणि दुसरा बदली पात्र शिक्षक नाही अशा परिस्थितीत फक्त बदली पात्र शिक्षकांलाच एक युनिट अंतर्गत फॉर्म भरावा लागतो* 


*➡️ 7)1 युनिट मध्ये फॉर्म भरताना दोघेही शिक्षक बदली पात्र असतील तर दोघांनाही फॉर्म भरावा लागतो* 


*➡️ 8)1 युनिटमध्ये 1 युनिट करिता ज्या शिक्षकांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यांच फॉर्म मधून दोघांनाही बदली मिळते* 


*➡️ 9)1 युनिट मधील दुसऱ्या जोडीदाराचा फॉर्म हा बदली पात्र मधून स्वतःचा वैयक्तिक फॉर्म भरावा लागतो तो सेफ्टी  (Sefty) फॉर्म असतो* 


*➡️ 10) जोडीदाराचा फॉर्म भरताना तो जोडीदाराच्या सेवाजेष्ठतेनुसार भरावा* 


*➡️ 11) 1 युनिट मधील दोन्ही फॉर्म मधील प्राधान्यक्रम हे सारखे भरण्याची गरज नाही जर आपण दोन्ही फॉर्म सारखे भरल्यास व दोघांमधील सेवाजेष्ठतेत एक वर्षापेक्षा जास्त फरक असेल तर जोडीदार विस्थापित होऊ शकतो*


*➡️ 12) वन युनिट मधून बदली देत असताना पोर्टल दोघांनाही वन युनिट मधून ज्या शिक्षकांनी फॉर्म भरलेला आहे त्याच फॉर्म मधून बदली देते जर त्याच फॉर्म मधून बदली झाली नाही तर प्रथम सेवा जेष्ठ शिक्षकाला बदली देते व नंतर आपल्या जोडीदाराचा फॉर्म त्यांच्या सेवाजेष्ठतीने तपासून त्याला बदली देते* 


*➡️ 13) वन युनिट मध्ये फॉर्म भरताना आपला जोडीदार बदलीस पात्र नसेल तर व त्यांना वन युनिट मधून बदली मिळाली नाही तर त्याची बदली होत नाही*


*➡️ 14) वन युनिट मधून अर्ज करताना दोन पदे रिक्त आहेत अशा शाळा प्राधान्याने निवडाव्यात व उर्वरित प्राधान्यक्रमत एक पद रिक्त असलेल्या शाळा भराव्यात* 


*➡️ 15) वन युनिट मध्ये बदली करताना पोर्टल प्रथमतः दोन पदे रिक्त असणाऱ्या शाळा तपासते जर आपणास दोन पदं असणारी शाळा देता आली नाही तर एक पदाच्या शाळेतून दोघांनाही बदली देण्यात येते*


*➡️ 16) एक युनिट संधीचा लाभ घेण्याकरिता बदली पात्र शिक्षकांबरोबर जोडीदाराला संबंधित शाळेवर तीन वर्ष सेवेची अट नाही.*


*✳️ बदली पात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरताना येणाऱ्या शंका व समाधान*


*➡️ 1) बदली पात्र शिक्षक आपल्यापेक्षा सेवाजेष्ठ किंवा सेवा कनिष्ठ शिक्षकांच्या शाळा मागू शकतात*


*➡️ 2) बदली पात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरतेवेळी जिल्ह्यातील सर्व रिक्त जागा व बदली पात्र शिक्षकांच्या उर्वरित जागाचा प्राधान्यक्रम भरता येतो*


*➡️ 3) ज्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रात किंवा अवघड क्षेत्रामध्ये सलग दहा वर्ष सेवा व कार्यरत शाळेवर पाच वर्षे झाले अशा शिक्षकांच्या जिल्हा सेवाजेष्ठतेने बदल्या केल्या जातात*


*➡️ 4) बदली पात्र शिक्षकांनी प्राधान्य क्रम भरताना आपल्या सेवा जेष्ठतेचा विचार करूनच भरावेत* 


*➡️ 5) बदली पात्र शिक्षकांना आपला प्राधान्यक्रम भरण्याकरिता 4 दिवसांचा वेळ दिलेला असतो त्या चार दिवसात आपण केव्हाही फॉर्म भरला तरीही त्याचा बदली प्रक्रियेवर कोणताही फरक पडत नाही* 


*➡️ 6) बदली पात्र शिक्षकांच्या बदल्या ह्या त्यांच्या सेवाजेष्ठतेने होतात* 


*➡️ 7) बदली पोर्टलवर प्रत्येक शिक्षकाचा 1 ते 30 प्राधान्यक्रम सिस्टीम तपासल्याशिवाय पुढील शिक्षकांचा प्राधान्यक्रम तपासत नाही*


*➡️ 8) बदली पात्र शिक्षकांनी शक्यतोवर विनंती पर्याय निवडूनच अर्ज करावा आपण अर्ज प्रशासकीय मध्ये भरल्यास आपण सरळ विस्थापित राऊंडमध्ये जाणार व विस्थापित राऊंडमध्ये पुन्हा आपणास आपला अर्ज प्रशासकीय मध्ये भरावा लागेल या ठिकाणी जर आपली शाळा कोणीही घेतली  नाही तर आपली बदली होणार नाही*


*➡️ 9) बदली पात्र शिक्षकांनी प्रशासकीय मध्ये अर्ज करून जर त्यांना बदली मिळाली नाही तर असे शिक्षक ज्या जिल्ह्यांमध्ये अवघड क्षेत्र आहे त्या जिल्ह्याच्या अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्याच्या यादीत समावेश होऊन त्यांची बदली टप्पा क्रमांक 7 मधून अवघड क्षेत्रात होऊ शकते* 


*➡️ 10) बदली पात्र शिक्षकांनी जर पसंती क्रम दिले नाहीत किंवा पसंती क्रम दिल्यानंतर त्यांच्या पसंतीक्रमतून बदली मिळाली नाही तर ते विस्थापित होऊन पुन्हा विस्थापित टप्प्यावर 30 शाळाचा प्राधान्यक्रम देण्याची सुविधा देण्यात येते*


*सदर पोस्ट आपण इतर ग्रुप वर edit न करता फॉरवर्ड करावी जेणेकरून त्यांनाही फायदा होईल.*


*याबद्दल कोणतीही शंका असल्यास 9767397707 या नंबरवर आपण मला सरळ कॉल करू शकता.*

*अखिल महा. प्राथ. शिक्षक संघ अमरावती मार्गदर्शन समुह*

*धन्यवाद*

रविवार, ३ ऑगस्ट, २०२५

71 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते...

 मनपूर्वक अभिनंदन 🌹 🌹 

कथल: अ जॅकफ्रूट मिस्ट्री' (Kathal: A Jackfruit Mystery) या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज 71 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ( National Film Award 2025) जाहीर केले आहे.

कथल: अ जॅकफ्रूट मिस्ट्री' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी फीचर फिल्मचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. ज्युरींनी शुक्रवारी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना पुरस्कार विजेत्यांची अंतिम यादी सादर केली, ज्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन आणि माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू देखील उपस्थित होते.

पुरस्कार  विजेते...

विशेष उल्लेख - प्राणी (री-रेकॉर्डिंग मिश्रण) एम आर राजकृष्णन

सर्वोत्कृष्ट ताई फाके चित्रपट - पै तांग

सर्वोत्कृष्ट गारो चित्रपट - रिम्डोगीतांगा

सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट - भगवंत केसरी

सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट - पार्किंग

सर्वोत्कृष्ट पंजाबी चित्रपट - गोड्डे गोडे चा

सर्वोत्कृष्ट ओडिया चित्रपट - पुष्कर

सर्वोत्कृष्ट मराठी - श्यामची आई

सर्वोत्कृष्ट कॅनेडियन चित्रपट - कंडिलू

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - कथल

सर्वोत्कृष्ट अ‍ॅक्शन दिग्दर्शन चित्रपट - हनु-मन (तेलुगू)

सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन - रॉकी और रानी की प्रेम कहानी (धिधोरी बाजे रे)

सर्वोत्कृष्ट गीत - बालगम (तेलुगू)

सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन - वाथी (तमिळ) - जीव्ही प्रकाश कुमार

सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन हिंदी - प्राणी- हर्षवर्धन रामेश्वर

सर्वोत्कृष्ट मेकअप हिंदी चित्रपट - सॅम बहादूर - श्रीकांत देसाई

सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनर - सॅम बहादूर-दिव्या गंभीर-सचिन लॉळेकर, निधी गंभीर

सर्वोत्कृष्ट साउंड डिझायनर - प्राणी - सचिन सुधाकरन, हरिहरन मुरलीधरन

सर्वोत्तम संवाद लेखक - फक्त एकच व्यक्ती पुरेशी आहे.

सर्वोत्कृष्ट छायांकन - द केरळ स्टोरी - प्राणस्तानु महापात्रा

सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका - शिल्पा राव

सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक - पीव्हीएनएस रोहित (तेलुगू)

सर्वोत्कृष्ट बालकलाकार - 1- गांधी आणि चेतू- सुकृती वेणी बांद्रेडी 2- जिप्सी- कबीर खंडारे 3- नाल- त्रिशा तोसर, श्रीनिवासपोकळे, भार्गव जगपत

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - राणी मुखर्जी

सर्वोत्कृष्ट अभिनेता - शाहरुख खान, विक्रांत मॅसी

सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट होलसम - रॉकी रानी की प्रेम कहानी

बेस्ट फीचर चित्रपट - 12th फेल

मंगळवार, २९ जुलै, २०२५

जागतिक वाघ दिनानिमित्त विशेष टेस्ट

World Tiger Day Quiz - जागतिक वाघ दिन

World Tiger Day Quiz - जागतिक वाघ दिन प्रश्नमंजुषा (20 प्रश्न)

महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा 2025

 



भारताचा अभिमान..! मनःपूर्वक अभिनंदन दिव्या..🌹🌹💐💐👍👍💐💐🌹🌹👍👍


जॉर्जियामध्ये पार पडलेल्या महिला विश्वचषक बुद्धीबळ स्पर्धेत दिव्या देशमुख हिने शानदार कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले..! नागपूरच्या या 19 वर्षीय बुद्धीबळपटूने सर्व देशवासीयांचा अभिमान वाढवला आहे.


दिव्याचे हे यश तरुणाईसाठी एक


प्रेरणास्त्रोत ठरेल!

तिला मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..!


सोमवार, २८ जुलै, २०२५

ए. पी. जे. अब्दुल कलाम

 

              *भारतरत्न*

*अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम*

              तथा  

*ए. पी. जे. अब्दुल कलाम*

(भारताचे ११ वे राष्ट्रपती,  वैज्ञानिक, अभियंता)

*जन्म : १५ ऑक्टोबर १९३*

                *(रामेश्वर)*

*मृत्यू : २७ जुलै २०१५*

                *(शिलाँग)*

सन्मान : भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण

                   कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरमला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य 

लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत होते. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.


🚀 *कार्य* 🛰

१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पिएसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकार्‍यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.

 📚 *शिक्षण*

त्यांचे वडील रामेश्वरमला येणार्‍या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत.त्यांचे वडील व लक्ष्मणशास्त्री नावाचे पुजारी घनिष्ठ मित्र होते.त्यांच्यातील अध्यात्मिक चर्चा कलाम ऐकत असत.डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्‌ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.


 ♦ *स्वभाव* 

विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत होणार्‍या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत.

 

🥇 *गौरव*

अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो.

भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' व १९९७ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला.

 

◼ *निधन*

ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची प्रकृती शिलाँग येथील आय.आय.एम.च्या कार्यक्रमात व्याख्यान देताना तबेत बिघडली. शिलाँगमधीलच एका रुग्णालयात त्यांनी २७ जुलै, इ.स. २०१५ रोजी अखेरचा श्वास घेतला.कलाम यांनी केलेल्या कार्याचा उपयोग भारतासाठी विविध कार्यात झाला आहे.

       

शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन, यशवंतराव चव्हाण सेंटर.* 2025

 *शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन, यशवंतराव चव्हाण सेंटर.* 

(बालशिक्षण) 


यावर्षीपासून (२०२५-२६) बालशिक्षणामध्ये काम करणार्‍या व्यक्तीसाठी शरद पवार इंस्पायर फेलोशिप इन एज्युकेशन (बालशिक्षण) देण्यात येणार आहे. 


🌀 एकूण १० फेलोशिप. 


🕹फेलोशिप कोणासाठी असेल?

महाराष्ट्रभरात बालशिक्षणात काम करणारी व्यक्ती 

🔹अंगणवाडी सेविका,

🔹पर्यवेक्षिका (सुपरवायझर) 

🔹 बालविकास प्रकल्प अधिकारी (CDPO) 

🔹बालशिक्षणात काम करणाऱ्या संस्थेतील कार्यकर्ते

🔹अनुदानित शाळांतील बालशिक्षक

🔹बालशिक्षण विभागप्रमुख 

(खाजगी अंगणवाड्यांमध्ये काम करणाऱ्यांना ही फेलोशिप नसेल)


✅ सविस्तर माहितीसाठी आणि ऑनलाईन अर्ज करण्याकरिता खालील वेबसाईटवरती क्लिक करावे. 

https://www.sharadpawarfellowship.com/


➡️ अर्ज करण्याची मुदत - १५ ऑगस्ट २०२५

रविवार, २७ जुलै, २०२५

कल्पना दत्ता


             *कल्पना दत्ता*

       (भारतीय क्रांतिकारक)


      *जन्म : 27 जुलै, 1913*

     (सिरपूर, चितगांव (बांग्लादेश), बंगाल)


     *मृत्यु : 8 फेब्रुवारी 1995*

        (कलकत्ता, पश्चिम बंगाल)


इतर नाव : कल्पना जोशी

पति : पूरन चंद जोशी

नागरिकता : भारतीय

चळवळ : भारतीय स्वातंत्र्य लढा

जेल यात्रा : फेब्रुवारी 1934 मध्ये 21 वर्षाच्या कल्पना दत्त यांना आजीवन कारावासाची शिक्षा झाली.


अन्य माहीती : सप्टेंबर  1979  मध्ये कल्पना दत्त यांना पुण्यात 'वीर महिला' या उपाधि ने सम्मानित  केले गेले.


कल्पना दत्ता  (नंतर कल्पना जोशी) ही एक भारतीय स्वातंत्र्य चळवळीतली कार्यकर्ती होती. ती सूर्य सेनच्या सशस्त्र चळवळीत होती. हे सूर्य सेन १९३० च्या चितगांवला झालेल्या शस्त्रागार धाडेच्या मागे होते. नंतर ती भारतीय कम्युनिस्ट पक्षाची सदस्य झाली, व तिने पुरणचंद जोशीशी विवाह केल. ती १९४३ साली भाकपची अध्यक्ष झाली. 


💁‍♀️ *सुरुवातीचे जीवन*


कल्पनाचा जन्म बंगालमधील चितगांव जिल्ह्यातील सिरपूर गावात झाला. १९२९ साली मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर, ती कलकत्त्याला बे्थ्थ्यून काॅलेज येथे विज्ञानात पदवी करण्यसाठी गेली. तेथे असतानाच ती विद्यार्थी संघ या क्रांतिकारी संस्स्थेची सदस्य झाली. त्या संस्थेत वीणा दास, प्रीतिलता वड्डेदार, ह्या पण सक्रिय होत्या.


🔫 *सशस्त्र चळवळ*


चितगांव शस्त्रागार धाड ही १८ एप्रिल १९३० ला पडली. त्यानंतर कल्पना १९३१ सालच्या मे मध्ये सूर्य सेनच्या सशस्त्र गटाच्या 'भारतीय रिपब्लिकन आर्मी’ च्या चितगांव शाखेत भरती झाली. सप्टेंबर १९३१ ला सूर्य सेनने तिला व प्रीतिलता वड्डेदारला चितगांव येथील युरोपियन क्लबवर हल्ला करण्यासाठी नेमले. पण हल्ला करण्याच्या एक आठवडा आधीच तिला हल्ल्याच्या जागेची टेहळणी करताना अटक झाली. जामिनावर सुटका झाल्यावर तिने लपून राहायला सुरुवात केली. १७ फेब्रुवारी १९३३ रोजी पोलिसांनी तिच्या लपण्याच्या जागेला घेरा दिला व सूर्य सेनला पकडले; पण कल्पना तिथून पळून निघाली. पुढे कल्पनाला १९ मे १९३३ रोजी अटक झाली. चितगांव धाडीच्या दुसर्‍या सुनावणीत तिला शिक्षा झाली. १९३९ मध्ये तिची सुटका झाली.


🙍🏻‍♀️ *नंतरचे जीवन*


कल्पना १९४० ला कलकत्ता विद्यापीठातून पद्वीधर झाली, व भाकपची सदस्य झाली. १९४३ च्या बंगालमधील दुष्काळात व बंगालच्या फाळणीच्या वेळेस तिने स्वयंसेवक म्हणून काम केले. तिने तिचे आत्मकथात्मक पुस्तक, चितगांव शस्त्रागार धाडीच्या आठवणी हे १९४५ ला इंग्रजीत प्रकाशीत केले. १९४६ मध्ये ती बंगाल विधान सभेत चितगांव येथून भाकप कडून निवडणूक लढली, पण जिंकू शकली नाही.


नंतर तिने भारतीय संख्याशास्त्रीय संस्था (Indian Statistical Institute) येथे निवृत्त होईपर्यंत नोकरी केली. ८ फेब्रुवारी १९९५ रोजी तिचा म्रुत्यू झाला.


💁‍♀️ *वैयक्तिक जीवन*


कल्पना दत्ताने १९४३ मध्ये भाकपचे अध्यक्ष पुरनचंद जोशी, ह्यांच्याशी विवाह केला.. त्यांना दोन मुले झाली. चंद व सूरज. चंद जोशी हा हिंदुस्तान टाइम्समध्ये पत्रकार होता.


🎞️ *चित्रपट*


चितगांवच्या धाडीवर २०१० मध्ये 'खेले हम जी जान से' हा हिंदी चित्रपट निघाला. त्यात दीपिका पादुकोनने कल्पनाचे काम केले होते. पुन्हा १२ आॅक्टोबर २०१२ ला 'चितगांव' हा आणखी एक चित्रपट निघाला त्याची निर्मिती आणि दिग्दर्शन वेदव्रत पॅन, ह्या नासातील माजी वैज्ञानिकाने केले होते.

          

बुधवार, २३ जुलै, २०२५

Month test 0011

Months - Quiz

Quiz on Months (महिने) - 20 Questions

Clock time reading test 009

घड्याळातील वेळ - MCQ Test

⏰ "Watch Time" – घड्याळातील वेळ आधारित 20 प्रश्नांची चाचणी



Punctuation test 008

Punctuation Quiz

Punctuation Quiz – विरामचिन्हे चाचणी

स्कॉलरशिप/स्पर्धा परीक्षा/जनरल नॉलेज

लोकप्रिय पोस्ट